माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला नादान सद्गुणांनी अवसानघात केला
जागून रात्र सारी, उपयोग काय झाला? सावज रणात येता, कुत्रा पळून गेला
सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?
नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या झालीय तीच राणी, माझा गुलाम केला
समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
वाचकांच्या भेटी