मुंबई - ४०० १०३ प्रिय कवी गंगाधर मुटे, तुमचे-आमचे प्रिय मित्र प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांनी पाठविलेला तुमचा आंबटगोड "रानमेवा" मिळाला. मन:पुर्वक आभार तुमचे आणि प्रा. सुरेशचंद्राचे. ’आंबटगोड’ म्हटले या रानमेव्याला कारण यामध्ये उपहास-उपरोधाचा ठसका देणारा आंबटपणा आहे आणि भावात्म काव्यात्मकतेचा ’गोडवा’ ही आहे. शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना असे ’शेतकरी-भोग’ भोगताही तुम्ही काव्य ’जगत’ आहात याबद्दल अभिनंदन. आणि सत्य ’आत्मगत’ आणि ’समूहगत’ ही - असाच प्रत्यय देणारे. अंगारमळा-आंबेठानच्या ख्यातनाम शरद जोशी यांच्यापासून पुणे-मुंबई-अहमदनगर-अकोला ते अगदी हॉंगकॉंग-कुवैत-आस्ट्रेलिया-अमेरिका येथपर्यंतच्या अनेक जाणत्यांनी तुमच्या ’रानमेव्या’ला दाद दिली आहे - त्यात तुम्हाला अज्ञात असलेल्या एका रसिकाची भर- तुमच्या खास आवडलेल्या कविता : बळीराजाचे ध्यान, माणूस, हे गणराज्य की धनराज्य?, अट्टल चोरटा मी, सरबत प्रेमाच्या नात्याचं, शल्य एका कवीचे, कुठे बुडाला चरखा?, धकव रं शामराव, आंब्याच्या झाडाला वांगे, लकस-फ़कस, झ्यामल-झ्यामल, तरी हुंदक्यांना गिळावे किती?, अंगार चित्तवेधी. तुमच्या कवितेतील ’कवितांना’ जन्म देणार्या प्रतिमा: गगनावरी तिरंगा - ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे * तारांगणे उद्याची - कक्षा तुझी असावी * छप्पर उडल्या संसारात ब्रह्मपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! * विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे * पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा * आकाश अंथरोनी, तार्यास घे उशाला बाहूत सूर्यचंदा, पाताळ पायशाला * लावती घामाला किंमत सस्ती त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ......! * उषेला बांग देऊ द्या की रं ......! * जीवाचा आटापिटा हाच त्यांचा बायोडाटा * अरे माणूस माणूस कसं निसर्गाचं देणं? गुण श्वापदाचे अभये नाही मानवाचं लेणं ......! * ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती * चंद्रास ग्रासताना अंधार घोर झाला तुमच्या कवितेतील सुंदर कल्पनाविलास: अट्टल चोरटा मी * सरबत...... प्रेमाच्या नात्याचं * विलाप लोकसंख्येचा तुमच्या कवितेतील शाब्दलय: