अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
अलका काटदरे's picture
प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी

इतका सुंदर आणि वैविध्यतेने नटलेला ’ओला’मेवा प्रकाशित करीत असल्याबद्दल प्रथम धन्यवाद. मुटे यांच्या निसर्गप्रेमावरील कविता छान असायच्या. त्यात अजून भर घालून त्यांनी देशप्रेम,वस्तुस्थिती,सामाजिक असे वेगवेगळे विषय हाताळले आहेत. गंमत म्हणजे निव्वळ लिहायचे म्हणुन त्यांनी लिहिले नसून ते अंतर्मनाने लिहिले गेले आहे. त्यांच्याबद्दल मला विशेष आदर आहे, तो यासाठी की ते खूप विनम्र आणि प्रांजळ आहेत. काव्य या प्रकाराचा ते आदर करतात आणि त्याविषयी आपले मत प्रदर्शनही करतात.

या संग्रहातील "घायाळ पाखरास" “आईचं छप्पर” आणि "हवी कशाला मग तलवार" हे मला विशेष आवडले.

त्यांच्या विडंबन काव्यशैलीबद्दल काय बोलावे? विडंबनकाव्य किती सरस लिहिले जावू शकते, हे त्यांच्याकडूनच शिकावे.

मुटेजी अगदी सहज कवितेतून गझल या प्रांतात शिरले आणि चक्क राज्य करू लागले! हे सर्व पाहता त्यांच्याकडे अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी किती आहे हे समजते. अशीच त्यांनी साहित्यात समृद्ध भर घालावी अशी सदिच्छा.

अलका काटदरे
मुंबई
..............................................................................................