कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
कधी भाट होई सख्या चेहर्यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------
कविता/गझल वृत्त - सुमंदारमाला
लगावली - लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
विश्वजीत गुडधे
अतिशय उत्तम कविता आहे.
Andi2702
मनःपूर्वक अभिनंदन. कविता आहेच अप्रतिम.
गंगाधर मुटे
विश्वजितजी, बिरबलजी
धन्यवाद.
Malubai
नमस्ते सर,
कविता खुप छान आहे.
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
ह्या ओळि खुप आवड्ल्या.
सागर
मुटेसाहेब,
पहिल्या क्रमांकाचे विजेते झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
सुंदरच लिहिता तुम्ही , पण कवितेत गावाला एवढ्या प्रभावीपणे प्रकट केल्याबद्दलही आपले मनापासून अभिनंदन
Suresh Shirodkar
मुटेसाहेब,
पहिल्या क्रमांकाचे विजेते झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
फारच सुंदर गझल लिहिलि तुम्ही.
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
ह्या ओळि खुप आवड्ल्या.
गंगाधर मुटे
मालुताई, सागरजी, सुरेशजी
मनःपूर्वक धन्यवाद.
मुक्तविहारी
खूपच छान गझल आहे सर !
मनापासून अभिनंदन करतो.
गंगाधर मुटे
मनपूर्वक आभारी आहे.